शिक्षण मंत्रालयाने नुकतीच NIRF (National Institutional Ranking Framework) Ranking 2025 जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीतील कॉलेजेसने प्रचंड वर्चस्व राखले असून महाराष्ट्रातील एकाही कॉलेजला टॉप ५० मध्ये स्थान मिळालेले नाही. शिक्षण झेत्रात प्रगत मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब चिंतेची मानली जात आहे.
NIRF Ranking म्हणजे काय?
NIRF ही देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याची अधिकृत पद्धत आहे. २०१५ मध्ये शिक्षण मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली. दरवर्षी हजारो कॉलेजेस व विद्यापीठे या रँकिंगसाठी अर्ज करतात आणि विविध निकषांवर त्यांचे मूल्यमापन केले जाते.
NIRF चे प्रमुख निकष:
- शिक्षण व अध्यापनाची गुणवत्ता (Teaching & Learning)
- संशोधन व नवोपक्रम (Research & Innovation)
- विद्यार्थ्यांचे परिणाम (Graduation Outcome)
- सामाजिक समावेश व पोहोच (Outreach & Inclusivity)
- प्रतिष्ठा (Perception/Reputation)
या निकषांवर आधारित गुण दिले जातात आणि अंतिम रँकिंग निश्चित केली जाते.
टॉप १० कॉलेजेसची यादी (२०२५)
| रँक | कॉलेजचे नाव | राज्य |
| १ | हिंदू कॉलेज | दिल्ली |
| २ | मिरांडा हाऊस | दिल्ली |
| ३ | हंस राज कॉलेज | दिल्ली |
| ४ | किरोरी मल कॉलेज | दिल्ली |
| ५ | सेंट स्टीफन्स कॉलेज | दिल्ली |
| ६ | रामकृष्ण मिशन विवेकानंद शताब्दी महाविद्यालय | पश्चिम बंगाल |
| ७ | आत्मा राम सनातन धर्म महाविद्यालय | दिल्ली |
| ८ | सेंट झेवियर्स कॉलेज | पश्चिम बंगाल |
| ९ | पीएसजीआर कृष्णम्मल महिला महाविद्यालय | तामिळनाडू |
| १० | पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स | तामिळनाडू |
या यादीत दिल्लीतील तब्बल ६ कॉलेजेस आहेत. पश्चिम बंगालमधील २ कॉलेजेस आणि तामिळनाडूतील २ कॉलेजेस या यादीत सामील आहेत.
महाराष्ट्राला ‘विद्येचं माहेरघर’ म्हटलं जातं. मुंबई, पुणे, अशा शहरांमध्ये नामांकित विद्यापीठे आणि शेकडो कॉलेजेस आहेत. तरीदेखील, यावर्षीच्या NIRF Ranking 2025 मध्ये महाराष्ट्रातील कोणतेही कॉलेज टॉप १० मध्ये पोहोचलेले नाही. मात्र टॉप १०० मध्ये महाराष्ट्रातील फर्ग्युसन कॉलेज, पुणे – रँक ५७, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई – रँक ८९, श्री शिवाजी सायन्स कॉलेज, अमरावती – रँक ९३ या तीन कॉलेजेसचा समावेश आहे.
महाराष्ट्रात चांगली परंपरा असलेली अनेक कॉलेजेस असली तरी त्यांना NIRF Ranking मध्ये अपेक्षित स्थान मिळत नाही. विशेषतः म्हणजे संशोधन व पेटंट्सच्या संख्येत कमतरता, विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत मर्यादा, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुरेशी गुंतवणूक न होणे, राष्ट्रीय पातळीवर कमी प्रचार-प्रसार अशी काही कारणे यामागे असू शकतात.
महाराष्ट्राने पुन्हा देशाच्या शिक्षण क्षेत्रात आपले स्थान मजबूत करायचे असेल तर संशोधनाला प्रोत्साहन देणे, अध्यापनात नवीन तंत्रज्ञान वापरणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेवर भर देणे आवश्यक आहे. ही पावलं उचलल्यास भविष्यात महाराष्ट्रातील अनेक संस्था टॉप ५० मध्ये झळकू शकतात.
NIRF Ranking 2025 मध्ये दिल्लीने पुन्हा वर्चस्व गाजवले असून महाराष्ट्रातील कॉलेजेस मात्र टॉप ५० मध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत. फक्त तीन कॉलेजेस टॉप १०० मध्ये आहेत ही बाब चिंताजनक आहे. योग्य धोरणं, जास्तीत जास्त गुंतवणूक आणि दर्जात सुधारणा झाल्यासच महाराष्ट्र पुन्हा स्पर्धेत यश मिळवू शकेल.